शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

शतकवीर कृष्णा पूल श्रमदानातून चकाचक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 23:16 IST

वाई : दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाºया वाई शहरात पालिकेच्या वतीने ‘स्वच्छ सर्वेक्षण’ मोहीम प्रभावीपणे राबविली जात आहे. या मोहिमेचा एकभाग म्हणून शंभर वर्षे पूर्ण झालेल्या येथील ब्रिटिशकालीन कृष्णा पुलाची स्वच्छता करण्यात आली.राज्य, देशपातळीवर मोठ्या प्रमाणावर स्वच्छता अभियान सुरू आहे़ राज्य शासनाने सर्व पालिकांमध्ये ‘स्वच्छ सुंदर शहर’ या स्पर्धेस प्रारंभ ...

वाई : दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाºया वाई शहरात पालिकेच्या वतीने ‘स्वच्छ सर्वेक्षण’ मोहीम प्रभावीपणे राबविली जात आहे. या मोहिमेचा एकभाग म्हणून शंभर वर्षे पूर्ण झालेल्या येथील ब्रिटिशकालीन कृष्णा पुलाची स्वच्छता करण्यात आली.राज्य, देशपातळीवर मोठ्या प्रमाणावर स्वच्छता अभियान सुरू आहे़ राज्य शासनाने सर्व पालिकांमध्ये ‘स्वच्छ सुंदर शहर’ या स्पर्धेस प्रारंभ केला आहे़ यामध्ये नगरपालिकांनीही मोठ्या उत्साहात भाग घेतला आहे. शहराच्या मध्यातून कृष्णा नदी जाते़ तिमासिक, सांस्कृतिक महत्त्व असणारी कृष्णा नदी वाईची अस्मिता म्हणून ओळखली जाते. नदी स्वच्छता केल्याशिवाय स्वच्छता अभियान यशस्वी होणार नाही़, या जाणिवेतून वाई येथील कृष्णा सेवा कार्य समिती, नगरपालिका, व्यावसायिक,नोकरदार व पर्यावरणप्रेमींनी‘एक दिवस कृष्णेसाठी’ हा उपक्रम गेली तीन महिन्यंपासून हातीघेतला होता. त्याचे फलित म्हणूनवाईचा कृष्णा घाट स्वच्छ व सुंदर झाला.स्वयंसेवकांनी घाट परिसरातील कचारा, झुडपे व प्लास्टिक कचरा गोळा केला आहे. नदीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेली जलपर्णी काढून घाटावरील सर्व गटारे स्वच्छ केल्याने पाण्याचे मूळ प्रवाह मोकळे झाले आहेत. या चळवळीस दिवसेंदिवस लोकसहभाग वाढ असून, स्वच्छतेविषयी नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जागृती होत आहे.कृष्णा नदीवरील ब्रिटिशकालीन पुलावर मोठ्या प्रमाणावर झाडे, झुडपे वाढली होती़ यामुळे पुलाच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला होता़ यासाठी कृष्णा सेवाकार्य समितीच्या काशिनाथ शेलार, दीपक ओसवाल, डॉ़ नितीन कदम, नगरसेवक चरण गायकवाड, राहुल कचरे यांनी पुढाकार घेऊन सेवाकार्य समितीच्या माध्यमातून पूल स्वच्छ व सुंदर करण्यात आल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.नागरिकांनीसहकार्य करावेकृष्णा नदीवरील ब्रिटिशकालीन पुलाला धोका पोहोचू नये म्हणून कृष्णा सेवाकार्य समितीच्या माध्यमातून पुलाची स्वच्छता केली आहे़ नागरिकांनीही पुलावरून निर्माल्याच्या पिशव्या व इतर काही टाकू नये, स्वच्छता राखण्यासाठी सर्वांचे अनमोल सहकार्य गरजचे आहे़ तरी या अभियानात सर्व वाईकरांनी सहकार्य करावे, असे अवाहन स्वच्छतादूत दीपक ओसवाल व काशिनाथ शेलार यांनी केले आहे़